Monday 24 October 2016

सुरगड श्रमदान मोहीम-९ऑक्टोबर २०१६(सोबत दुर्गवीर परिवार)

पुरातत्व खाते व महाराष्ट्र संवर्धन समिति अंतर्गत स्वच्छता मोहिमे निमीत्त ही तशी तिसरी मोहिम. पहिल्या दोन मोहिमा यशस्वी पार पाडल्या होत्या.आता तिस-या मोहिमेसाठी आम्ही दुर्गवीर सज्ज झालो होतो.

शनिवार-रविवार रजा असल्याने माझ्या डोक्यात ब-याच विचारांच काहुर माजल होत, तस पाहता मी दुर्गवीर सोबत अनेक श्रमदान मोहिमा केल्यात तरही ही श्रमदान मोहिम खास असण्याला अनेक कारण होती, त्यातला एक कारण म्हणजे माझी “सुरगड” वर पहिलीच श्रमदान मोहिम होती आणि दुसर आणि महत्वाच कारण म्हणजे नितीनजी नी या गडाबद्दल काहीस औत्सुक्यपुर्ण माहिती दिली होती. त्यांनी मला सांगितली होती ,कि गड खुप कठिण आहे.एक पॅच जरा रिस्कीच आहे. पण गड खूप छान आहे जाऊन बघ,त्यामुळे डोक्यात नव्या आव्हानाची तयारी केली होती फक्त प्रत्यक्षात सुरगडाच्या दर्शनाची आस लागली होती.
ठरल्याप्रमाणे जागेवर पोहोचायची तयारी केली पण काय करणार सालाबादप्रमाणे मला उशिर झालाच, सर्व दुर्गवीर / दुर्गविरांगणांना आम्ही जुईनगरला भेटलो पुढे थोडेसे खावुन पोटाला आधार देत आगेकूच करायला सुरू केली, मला एक खाद्य नविनच होते ते म्हणजे 😋गोडदही+चिबुड😋जे “धिरु सरांनी” आणले होते ,मी कोकणातली असुनही पहिल्यांदा गोडदहि + चिबुड हा प्रकार ऐकला आणि खाण्याचा योगही त्या दिवशी आला काय अप्रतिम होते ते (धिरु सर पुन्हा कधीतरी घेऊन या हो स्वीट डिश)😋
मोहिमेला जाताना श्रमदानाचे साहित्य लागणार म्हणून प्रज्वलच्या घरी जाऊन श्रमदानाचे साहित्य घेतले. मोहिमेला सुरूवात झाली आमचा महिलांचा गप्पा टप्पाचा फड चालू झाला आणि बघता बघता सुरगड कधी आला हेच कळले नाही ,सुरगडावर जाण्यासाठी काही मावळे आधीच पोहचले होते.
आम्ही पहाटे ४ ला पार्टे बाबांच्या घरी पोहचलो त्याचे आणि दुर्गवीर चे संबध घरच्यांसारखेच त्यामुळे घरातलेच आहोत असे आम्ही वागत वावरत होतो.जणू लहान मुलांची सहल यावी आणि मनसोक्त वागावे असेच चालले होते.
पहिला प्रहर होणार यात आमच्या निघण्याची लगबग चालू झाली. कांदेपोहे फस्त करत गड सर करण्यासाठी सर्वांनी कुच केली. रानावनात भटाकायची हौस आहे पण गावी जाण येण नसल्याने फारशी माहीती नाहि पण त्याचा अनुभव घ्यायला गडकिल्ले फिरावेत. रानातली झाडे त्यातून जाणारी ती नागमोडी वाट बाजूला एखादी पडीक विहीर पाहत वाट तुडवत पुढे निर्सग पहात निघाले. मध्येच नदीने(ओढा) आडवलेली वाट तिच्या कुशीतून आम्ही पुढे पुढे सरकत होतो. मुबंईत हे अस प्रसन्न वातावरण अनुभवने तसे दुर्मिळच.... मी तर मज्जा करत त्या नदीच्या(ओढ्याच्या) पाण्यात चालत होते, खूप सुंदर नदी होती ती, थोड्याच वेळात सुरगडच्या त्या माथ्यावर पोहचलो. खरं तर त्या गडावरील अन्साई देवीच्या दर्शनाने सर्वाचा त्राण कमी झाला. सर्वांनी स्वतःचा परिचय करून दिला. आता खरी मज्जा पुढे होती. दोरी बांधून तो पॅच चढणे, हो ज्याची मी आतुरतेने वाट पहात होते. खरच इतिहासात मावळे चपळाईने गडावर कसे चढत असतील या विचाराने मन शहारुन निघत होते. या विचाराने थोडी भिती मनात होती. पण धिरु सरांनी अगोरच धीर दिलेला असल्याने स्वतः वर विश्वास ठेवुन तो पॅच पार केलाच. एक वेगळा अनुभव मिळाला ,पण रसिका आणि हेमांगी याचं पण कौतुक त्यांनी तो पॅच न घाबरता पार केला, पण गितुताईचे मला खूपच कौतुक वाटते कि पायाची अडचण असूनही तिने तो पॅच पार केला.

सर्वांनी हा अनुभव गाठीशी घेत आम्ही पुढे कुच केली.शेवटी आम्ही गवतातुन वाट काढत धान्य कोठाराकडे पोहचलो. आता मोहिमेला सुरूवात करण्यासाठी तीन विभागात आम्ही सर्व तुटून पडलो.
साफ सफाई करत दुर्गवीरचे शिलेदार हा हा म्हणता मारूती मंदिर , शिवमंदिरचा परिसर साफसफाईचे काम केले. तसे दुर्गवीरचे मावळे आणि दुर्गवीरांगना आम्ही काम फत्ते हे करणारच आणि केले ही झालेल्या कामाने समाधानाने सर्वांनी एक नजर फिरवली मग भटकंती सुरू झाली गड फिरत असताना गडावरील कोरीव शिलालेख त्यावेळचा इतिहासच सांगत असावा. गडावरील विचारपुर्वक केलेले बांधकाम हे या काळातील इंजिनियर लोकांना ही लाजवेल इतक्या सुखसोयी करून ठेवल्या होत्या त्याच्या या विचारसरणीने मी थक्कच झाले.

दुपार जशी होत गेली तसे आम्ही मारुती मंदिर चा परिसर साफ करून मारुतीची पूजा केली.आणि गड उतरायला निघालो.परत तो पॅच सांभाळत उतरलो.घरी येऊन पोटपूजा केली आणि पार्टे आई नी चहा साठी पण आग्रह केला ,थोडी मी डुलकी पण घेतली कारण दमले होते. 4 वाजता मुंबईच्या दिशेने कूच केली. हा रस्ता पण मध्ये मध्ये खूप खराब त्यामुळे शेवटी द्रुतगती मार्गाला पोहचायला ९ वाजले. नंतर मात्र सुसाट वेगाने मुबंई गाठली.
आज मी आणि माझे घर याचा प्रत्येजण विचार करत आहे, मग या धरोवराची काळजी करणार कोण ? तसे तर महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला पर्यटन खात्यासाठी एक सोन्याची खाण आहे पण म्हणतात ना .... गुळाची चव काय माहित असो... पण त्याही पुढे येणारा पर्यटक हा स्वताला शिवरायांचा मावळा म्हणवतो पण या इतिहासाच्या साक्षीदारांवर घाव घालून त्यांनाच घायाळ करतो, हे सर्व पाहवत नाही. हिच संपत्ती अनेक वर्षानुवर्ष महाराजांचा हा इतिहास गगणभेदि गर्जनेने जगासमोर यावा यासाठी आमच्या दुर्गवीर प्रतिष्ठान धडपडत आहे.
तीनही मोहिमा फत्ते केल्याचा आनंद आमच्या प्रत्येकाच्या चेहर् यावरून ओसंडून वाहत आहेत आमच्या सोबत आलेले नवीन शिलेदार ना खूप छान वाटलं,
घरी जाताना खरच जड अतंकरणाने सुरगडाने निरोप घेतला खरा पण एवढ्या कळकळीने हेही सांगत होता जशी माझी काळजी घेतलीत तशीच माझ्या इतर गडकिल्यांची ही घ्या
हिच साद आज प्रत्येक किल्ल्याची असून अशा मोहिमा आयोजित करून या इतिहासाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न दुर्गवीर प्रतिष्ठान करते, म्हणतात हाताला हात मिळाले कि बळ

वाढते.
असे अनेक शिलेदार मिळुन जर का हि धरोवर जतन केली तर पुढची पिढी आपल्याला लाखलाख धन्यवाद देतील🙏
कल्पु-उवाच.com
जय शिवराय
http://kalpuuvach.blogspot.in/

1 comment: