🌴🙏सिंधुदर्ग
किल्ला मालवण जवळच्या अरबी समुद्रातील एक स्वराज्याची शान, शिवरायांच्या
कर्तबगारीची अवाढव्य साक्ष, कोकण किनार्याची शोभा वाढवणारा हा ऐतिहासिक
किल्ला.
सिंधुदुर्ग किल्ला (मालवण)
या किल्ल्याला भेट देण हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय दिवस.rkfc कुटूंबाच्या स्नेहसंमेलनामुळे शक्य झाला
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जेंव्हापासून जायचं ठरलं तेंव्हापासून नेहमीसारखाच हा दिवस कधी उजाडतोय याचीच वाट पाहत होते,
आम्ही वेंगुर्ला वरून दिनांक २८ मे रोजी सकाळी ८.०० वाजता निघालो मालवणला पोहचायला ११.०० वाजले.तिकडेच आम्ही चहा नास्ता केला आणि थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर. मालवण मधील बाजारपेठेत थोड ट्राफिक भेटलं मन खूप उदास झाल होत. आधीच पोहचायला उशीर झाला होता आणि त्यात हे थोडस ट्राफिक. आणि 2 तासांचा प्रवास करून थकलेल शरीर, तरीही किल्ल्यावर जायची उत्सुकता, गुगलवर सर्च करून करून बरीचशी माहिती मिळवली होती. पण प्रत्यक्षात पाहण्यात जी मज्जा असते ती तुम्हालाही वेगळी काही सांगायला नको. किनार्यावर पोहचल्या… पोहचल्या किल्ल्याच दुरूनच दर्शन झालं.
निसर्गरम्य, नयनरम्य ठिकाण आणि किल्ल्याच ते रूप पाहून क्षणात अंगातील सारा क्षीण उतरून गेला होता.
शाळेमधून सहल जायची. पण तेंव्हा एवढ काही गड किल्ल्याचं आकर्षण न्हवत.. जेव्हापासून दुर्गवीर मध्ये सदस्य झाले तेंव्हापासून ठरवलंच शिवरायांचेच गडकोट फिरायचं तेंव्हापासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं ठरल होतं आणि तो दिवस आज आलाच..
मालवणच्या किनार्यावरून त्या दूरवरच्या किल्ल्याकडे पाहिलं कि किल्ल्याकडे पाहतच रहाव आणि तिथच रमावं अस वाटतं. किनार्यावरून किल्ल्यावर जायला तिथे चांगली सोय आहे. एका ४० /५० आसनी होडीत बसून किल्ल्यावर जायची सोय आहे. ५० रुपये तिकिटाच्या ४४ तिकीट घेतल्या आणि आम्ही निघालो त्या होडीत बसून. अथांग समुद्रात हेलकावे खात आमची होडी निघाली. जस जस किल्ल्याच्या जवळ जातोय तशी मनात एक वेगळीच उत्सुकता दाटली होती. किल्ल्याच्या बाहेरच्या समुद्री पाण्यात मोठे मोठे खडक डोक वर काढत होते. त्यामुळे नावाडी आमची होडी त्या खडकांवर आदळू नये याची विशेष खबरदारी घेत होते. त्यातून वाट काढत आम्ही कधी किल्ल्याजवळ पोहचलो ते कळलेच नाही. होडीतून उतरून समोर पाहिले ते सिंधुदुर्ग किल्ल्याच आवाढव्य रूप नजरेत भरलं. समोरच दिसणारा दरवाजा दिसला आणि त्या दरवाजाच्या वरती असणाऱ्या भिंतीच्या टोकावर भगवा झेंडा.
किल्ल्याच्या दरवाजाकडे.मारुतीची मूर्ती
आत शिरताच समोर असणारी मारुतीची मूर्ती तिला वंदन करून दरवाजाच्या वरच्या साईट जायला उजवीकडे पायर्या आहेत .किल्याच्या तटावरून गोल फेरफटका मारला. शिवरायांनी कसा आणि किती मेहनतीने हा किल्ला बांधला असेल यावर चर्चा रंगत होती. सभोवार नीळा समुद्र आणि किल्ल्याच्या तटांवर आदळून फेसाळणार्या लाटा मनाला प्रसन्न करत होत्या. तटबंधी फिरून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या मधोमध आलो. उत्सुकता होती ती गोड पाण्याच्या विहिरींची. एवढ्या मोठ्या खाऱ्या पाण्याच्या समुद्रात मधोमध गोड पाण्याच्या तीन विहिरी म्हणजे जगातलं एक आश्चर्यच आहे. त्या विहिरींची नाव आहेत दुध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर या तिन्ही विहिरी पाहून खरच धन्य झाल्यासारखं वाटल. पुढे किल्ल्यावर लोकवस्ती हि होती तिथे चार पाच घरे दिसली. बाजूलाच संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर आढळणार एकमेव शिवरायांच मंदिर ” श्री शिवराजेश्वर मंदिर” या मंदिराची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती. या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात आहे. मूर्तीच्या बाजूला दोन तलवारी, ढाल, जिरेटोप ठेवलेला आहे. त्या शिवमूर्तीच दर्शन घेवून आम्ही किल्ल्याचा निरोप घ्यायचा ठरवला.
श्री शिवराजेश्वर मंदिर
शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात
बाहेर समुद्र किनार्यावर थोडी मौज मस्ती करून आम्ही पुन्हा निघालो ते किल्ल्यापासून दूर.. पुन्हा कधीतरी येईन असाच मनाला समजावून. आम्ही होडीत बसलो आणि मालवणच्या किनार्यावर पोहचलो.
सिंधुदुर्ग किल्ला अजूनही मनात तसाच साटला होता. कितीतरी वेळ ते दृश, किल्ल्याच रूप डोळ्यांसमोरून हलतच न्हवत.
आणि शिवकालीन बखरकार चित्रगुप्त यांनी आपल्या बखरीत लिहिलेला मजकूर आठवला.
🙏“सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।”🙏
🙏“तोड नाही जगी या स्वराज्याच्या शिवराया
सिंधुदुर्गावर सागर अवतरला माझ्या राजांचे पाय धराया
धन्य झाला तोही राजांचे चरणस्पर्श होता
जागा दिली कुशीत झाला स्वराज्याचा रक्षणकर्ता”🙏
सिंधुदुर्ग किल्ला (मालवण)
या किल्ल्याला भेट देण हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय दिवस.rkfc कुटूंबाच्या स्नेहसंमेलनामुळे शक्य झाला
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जेंव्हापासून जायचं ठरलं तेंव्हापासून नेहमीसारखाच हा दिवस कधी उजाडतोय याचीच वाट पाहत होते,
आम्ही वेंगुर्ला वरून दिनांक २८ मे रोजी सकाळी ८.०० वाजता निघालो मालवणला पोहचायला ११.०० वाजले.तिकडेच आम्ही चहा नास्ता केला आणि थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर. मालवण मधील बाजारपेठेत थोड ट्राफिक भेटलं मन खूप उदास झाल होत. आधीच पोहचायला उशीर झाला होता आणि त्यात हे थोडस ट्राफिक. आणि 2 तासांचा प्रवास करून थकलेल शरीर, तरीही किल्ल्यावर जायची उत्सुकता, गुगलवर सर्च करून करून बरीचशी माहिती मिळवली होती. पण प्रत्यक्षात पाहण्यात जी मज्जा असते ती तुम्हालाही वेगळी काही सांगायला नको. किनार्यावर पोहचल्या… पोहचल्या किल्ल्याच दुरूनच दर्शन झालं.
निसर्गरम्य, नयनरम्य ठिकाण आणि किल्ल्याच ते रूप पाहून क्षणात अंगातील सारा क्षीण उतरून गेला होता.
शाळेमधून सहल जायची. पण तेंव्हा एवढ काही गड किल्ल्याचं आकर्षण न्हवत.. जेव्हापासून दुर्गवीर मध्ये सदस्य झाले तेंव्हापासून ठरवलंच शिवरायांचेच गडकोट फिरायचं तेंव्हापासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं ठरल होतं आणि तो दिवस आज आलाच..
मालवणच्या किनार्यावरून त्या दूरवरच्या किल्ल्याकडे पाहिलं कि किल्ल्याकडे पाहतच रहाव आणि तिथच रमावं अस वाटतं. किनार्यावरून किल्ल्यावर जायला तिथे चांगली सोय आहे. एका ४० /५० आसनी होडीत बसून किल्ल्यावर जायची सोय आहे. ५० रुपये तिकिटाच्या ४४ तिकीट घेतल्या आणि आम्ही निघालो त्या होडीत बसून. अथांग समुद्रात हेलकावे खात आमची होडी निघाली. जस जस किल्ल्याच्या जवळ जातोय तशी मनात एक वेगळीच उत्सुकता दाटली होती. किल्ल्याच्या बाहेरच्या समुद्री पाण्यात मोठे मोठे खडक डोक वर काढत होते. त्यामुळे नावाडी आमची होडी त्या खडकांवर आदळू नये याची विशेष खबरदारी घेत होते. त्यातून वाट काढत आम्ही कधी किल्ल्याजवळ पोहचलो ते कळलेच नाही. होडीतून उतरून समोर पाहिले ते सिंधुदुर्ग किल्ल्याच आवाढव्य रूप नजरेत भरलं. समोरच दिसणारा दरवाजा दिसला आणि त्या दरवाजाच्या वरती असणाऱ्या भिंतीच्या टोकावर भगवा झेंडा.
किल्ल्याच्या दरवाजाकडे.मारुतीची मूर्ती
आत शिरताच समोर असणारी मारुतीची मूर्ती तिला वंदन करून दरवाजाच्या वरच्या साईट जायला उजवीकडे पायर्या आहेत .किल्याच्या तटावरून गोल फेरफटका मारला. शिवरायांनी कसा आणि किती मेहनतीने हा किल्ला बांधला असेल यावर चर्चा रंगत होती. सभोवार नीळा समुद्र आणि किल्ल्याच्या तटांवर आदळून फेसाळणार्या लाटा मनाला प्रसन्न करत होत्या. तटबंधी फिरून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या मधोमध आलो. उत्सुकता होती ती गोड पाण्याच्या विहिरींची. एवढ्या मोठ्या खाऱ्या पाण्याच्या समुद्रात मधोमध गोड पाण्याच्या तीन विहिरी म्हणजे जगातलं एक आश्चर्यच आहे. त्या विहिरींची नाव आहेत दुध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर या तिन्ही विहिरी पाहून खरच धन्य झाल्यासारखं वाटल. पुढे किल्ल्यावर लोकवस्ती हि होती तिथे चार पाच घरे दिसली. बाजूलाच संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर आढळणार एकमेव शिवरायांच मंदिर ” श्री शिवराजेश्वर मंदिर” या मंदिराची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती. या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात आहे. मूर्तीच्या बाजूला दोन तलवारी, ढाल, जिरेटोप ठेवलेला आहे. त्या शिवमूर्तीच दर्शन घेवून आम्ही किल्ल्याचा निरोप घ्यायचा ठरवला.
श्री शिवराजेश्वर मंदिर
शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात
बाहेर समुद्र किनार्यावर थोडी मौज मस्ती करून आम्ही पुन्हा निघालो ते किल्ल्यापासून दूर.. पुन्हा कधीतरी येईन असाच मनाला समजावून. आम्ही होडीत बसलो आणि मालवणच्या किनार्यावर पोहचलो.
सिंधुदुर्ग किल्ला अजूनही मनात तसाच साटला होता. कितीतरी वेळ ते दृश, किल्ल्याच रूप डोळ्यांसमोरून हलतच न्हवत.
आणि शिवकालीन बखरकार चित्रगुप्त यांनी आपल्या बखरीत लिहिलेला मजकूर आठवला.
🙏“सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।”🙏
🙏“तोड नाही जगी या स्वराज्याच्या शिवराया
सिंधुदुर्गावर सागर अवतरला माझ्या राजांचे पाय धराया
धन्य झाला तोही राजांचे चरणस्पर्श होता
जागा दिली कुशीत झाला स्वराज्याचा रक्षणकर्ता”🙏
सुंदर सुरवात , शुभेच्छा. आणि अभिनंदन..
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद पंकज
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKhoop sundar anubhav😍✌
ReplyDeleteKhoop sundar anubhav😍✌
ReplyDelete